नळदुर्ग किल्ल्यावरून आईने तीन चिमुकल्यांसह उडी घेतली; माय-लेकाचा मृत्यू, दोन मुली गंभीर… टोकाच्या निर्णयामागचं गूढ काय?
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली. एका महिलेने आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्यावरून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत महिलेचा आणि एका मुलाचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या टोकाच्या निर्णयामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नळदुर्ग पोलीस तपास करत आहेत.