Gayatri Laxmikant Maliशक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत विराट मोर्चा; ‘सरकारचा अतिरेक परतवून लावू’, जयंत पाटलांचा इशारा
शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत २१ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत “शक्तिपीठासाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू” असा इशारा दिला. सतेज पाटील, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व महिला मोर्चात सहभागी झाले. सरकारने महामार्गाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि सत्ताधारी आमदार-खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.