मराठा आरक्षणावर सरकारचा मोठा इशारा; प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यात जाणूनबुजून टाळाटाळ होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, 29 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी 58 लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबवू नये, अशी मागणी केली आहे.